Friday, November 12, 2010

भान

वर्ष सरता सरता भान उरलेच नाही
पण पळताना सारखे काही बोचत राही

कुठूनसा आला तो एक दिवस मनाचा
भेटला सखीला सवंगडी मनाचा
काय सांगू काय नको किती वादळे मनात
सरलेल्या दिवसांची साखळी स्वप्नात

तिथूनच सुरु झाली मनाची सावली
सावली वर झालर अनेक आकांक्षांची
किती बोलले मी तेव्हा सर्व सांगून टाकले
परी भासे अजून मला सर्व जपून ठेवले

मनाचा आधार मनाशीच खेळ
अंतर दिवसाचे पण भास सतत
भावनांचा उद्वेग मग शब्दात पसरला
विळख्यात त्याच्या असा श्वास अडकला

कधी येते अंधारून, पाउस बरसतो वनात
त्याची आठवण तेव्हा, होते असह्य उरात
गीते अनेक रचून उडतात गगनात
गीतातून भेटतो मला मनीचा सखा ग

वर्ष सरता सरता भान उरलेच नाही
पण बोचलेले आता नुसते खुपत राही ....

No comments: